
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना : ग्रामपंचायत धावेडी/थार येथे लोकसहभाग व श्रमदानाच्या बळावर महत्त्वपूर्ण असा वनराई बंधारा तयार करण्यात आला. गावाच्या पाणीअभावी परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला.

सकाळपासून सुरू झालेल्या श्रमदानात महिलांसह युवक, शेतकरी, ग्रामसेवक,ग्रामपंचायतीचे सदस्य, आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सामूहिक श्रमातून बांधलेला हा बंधारा पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढविण्यास मदत करणार असून आगामी रब्बी हंगामासाठीही याचा मोठा उपयोग होणार आहे.
ग्रामपंचायत सरपंचांनी सांगितले की, “लोकसहभागातून उभारलेला हा प्रकल्प गावाच्या विकासासाठी एक आदर्श ठरणार आहे.”
वनराई बंधारा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून गावाच्या जलसंधारण क्षमतेत वाढ होणार आहे.

छान बातमी लावली